टीम लय भारी
मुंबई : भाजप सरकारी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत असा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. सरकारविरोधी भूमिका घ्यायची असेल तर जनतेत जाऊन स्वत:बद्दलची विश्वासाहर्ता सिद्ध करा असं म्हणतं त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. Minister Chhagan Bhujbal criticize BJP government
आज मंत्री छगन भुजबळ जनता दरबारासाठी प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांनी विचारलेल्या काही प्रश्नांना छगन भुजबळ यांनी उत्तर दिले.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राजकारणातील लढाई आपण जनतेच्या कोर्टामध्ये लढूया असे सांगितले होते परंतु तुम्ही (भाजप) मध्येच शिखंडीसारखा केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करत आहेत असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
याप्रसंगी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर ही टीका केली आहे. एकेकाळी काही विरोधक मोदी व भाजपच्या विरोधात बोलत होते. मग त्यांना ईडीची नोटीस गेली आणि त्यांच बोलणं थांबलं. कोहीनूर टॉवर गैरव्यवहार व ३५० कोटींची खंडणी हे सारे प्रकार आपण बातम्यांमधून वाचले आहेत. मात्र आता त्यावर काहीच वाच्यता नसते, असेही छगन भुजबळ म्हटलं आहे. Minister Chhagan Bhujbal criticize BJP government
पुढे त्यांनी म्हटलं की, काही नेत्यांनी ईडीच्या कारवाईमुळे भीतीने भाजपमध्ये गेले आहे. हे नेते म्हणतात की आता आम्हाला शांत झोप लागते आहेत. हा सगळा प्रकार म्हणजे रडीचा डाव आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळे विरोधकांना आणखी दोन वर्ष थांबायला वेळ नाही. जर आम्ही काही चुकीचे केले असेन तर जनता तुम्हाला निवडून देईलच. मात्र विरोधकांना थांबण्यासाठी सुद्धा सवड नाही असा टोलाही छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला.
हे सुध्दा वाचा:
Ensure untreated sewage does not reach Godavari: Chhagan Bhujbalhttps://timesofindia.indiatimes.com/city/nashik/ensure-untreated-sewage-does-not-reach-godavari-bhujbal/articleshow/90629951.cms
छगन भुजबळ यांनी दत्तात्रय भरणेंचा केला सत्कार