शनिवारी बारामतीमध्ये राज्यसरकारचा राज्य नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील सर्व राजकिय नेत्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांना कार्यक्रमाची निमंत्रक पत्रिका आली आहे. परंतु शरद पवार यांना या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका न आल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले.
हे सुद्धा वाचा
नाशिक शेतीला नवतंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादनात वाढ-छगन भुजबळ
नाशिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन
Ajit Pawar Letter : “…आणि म्हणून मी वेगळी भूमिका घेतली”, अजित पवारांनी जनतेला लिहिलं खुलं पत्र
संजय राऊत माध्यमाशी बोलताना म्हणाले की एखादा नेता जर आपल्या पक्षाचा नसले तर त्याला आपण शासकीय कार्यक्रमाला बोलवू नये असे कसे हे सरकार वागू शकते.ज्या प्रश्नांवर सरकारने बोलायला पाहिजे त्या विषयावर सरकार बोलत नाहीये. भाजप सत्तेत आल्यापासून घाणरेडे राजकारण राज्यात चालू आहे. आताचे सरकार सुसंस्कृत महाराष्ट्राला लागली वाळवी आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या गटाचे खा. राऊत यांची टीका केली.