टीम लय भारी
मुंबई : मी दूरचित्रवाणीवर बघतोय. आमदार येतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटतात. अन् नंतर ते गुवाहाटीमध्ये पोचतात. हे आश्चर्यकारक आहे. याचा अर्थ ही मंडळी हृदयापासून विचार करीत नाहीत. ते खिशातून विचारत करतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल गोटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अनिल गोटे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ जारी केला आहे. त्या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे सरकार वाचावे यासाठी कुठल्याच नेत्याने प्रयत्न केलेले दिसत नाहीत. तसे प्रयत्न झाल्याचे मी मानायला तयार नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.सत्तेचे बाजारीकरण झाले आहे. यापूर्वी कधीही लोकशाहीचे इतके बिभत्स रूप पाहायला मिळाले नव्हते. पैशांचा व काळ्या पैशांचा सर्रास वापर झाल्याचे दिसत आहे.
जे गेले ते काही राजकुमार नाहीत. त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आला ?. ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांना हे सगळं दिसत नाही का ? असे सवालही अनिल गोटे यांनी केले आहेत.
हे सुद्धा वाचा : ‘बंडोपंतां‘चा पंचतारांकीत हॉटेलांचा, चॅटर्ड विमानांचा खर्च करतयं कोण ?
उध्दव ठाकरेंविषयी सहानुभूतीची लाट,एकनाथ शिंदेंना शिव्यांचा भडीमार !
राजकीय संकट असतानाही उध्दव ठाकरे सरकारने शेतकरी, तरुणांसाठी घेतले स्तुत्य निर्णय