30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांनी विचारले भांडी आणलीत का? : नारायण राणे

मुख्यमंत्र्यांनी विचारले भांडी आणलीत का? : नारायण राणे

टीम लय भारी

मुंबई : दिवाळीनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. चिपी विमानतळाच्या उद्धघाटन समारंभावेळी मुख्यमंत्री माझ्या कानात कुजबुजले म्हणाले, भांडी आणली आहेत का ? असे विधान राणे यांनी केले आहे (Narayan Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray).

त्यावेळी मला काही समजले नाही म्हणून मी त्यांच्या जवळ गेलो मग त्यांनी सांगितले भांडी फोडणार आहात ना? त्यासाठी भांडी आणली आहेत का? मग मला राग आला मी म्हंटले आता फोडणारच भांडी. त्यानंतर त्यांचा आवाजच बंद झाला असे म्हणत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मजेशीर टीका केली आहे. एका पत्रकाराने नारायण राणे चिपी विमानतळाच्या यांना उद्धघाटन समारंभावेळी मुख्यमंत्री कानात काय बोलले? असा प्रश्न केला असता राणे यांनी उत्तर दिले.

नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे माझ्या कानात काहीतरी पुटपुटले; विनायक राऊतांनी पेढा दिला

उद्धव ठाकरे – नारायण राणे शेजारी शेजारी, चेहरे मात्र वेगवेगळ्या दिशेला !

त्याचबरोबर मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असा मुख्यमंत्री पहिला नाही. विषय माहित नाही काहीही बोलतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाला उद्धव ठाकरे कलंक आहेत असे म्हणत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच मंचावर

After Minister’s Arrest, Rivals Uddhav Thackeray, Narayan Rane Share Stage

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी