राज्यातील मंत्री, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे गेल्या महिनाभरात राज्यातील वातावरण तापले आहे. महाराष्ट्रातील महापुरूषांबाबत वारंवार होणारी आक्षेपार्ह वक्तव्ये, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर आज महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चाला लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चातील काही क्षणचित्रे.
या मोर्चाची सुरुवात भायखळा येथील रिचर्डसन कंपनीपासून झाली असून. बोरिबंदर येथील टाईम्स ऑफ इंडिया येथे या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
या मोर्चात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदी पक्षदेखील सहभागी झाले होते.
महामोर्चात संजय राऊतांन सोबत महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांचा ही समावेश.
महामोर्चात उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे यांचाही मोर्चात समावेश दिसुन आला .
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाराष्ट्र प्रेमी समुदायाने काढलेल्या विराट मोर्चाची काही निवडक क्षणचित्रं! पाहणाराचं vision विशाल असेल तर फोटोही तसेच दिसतील आणि vision ‘नॅनो’ असेल तर अतिविराट मोर्चाही ‘नॅनो’च दिसेल! – ‘रोहित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
महाविकास आघाडीच्या मोर्चात सामील होण्यासाठी दत्ता परुळेकर बोरीवलीहून सायकलीवर आले आहेत , दत्ता 40 वर्षांपासून सायकलीवर फिरून शिवसेनेचं प्रचार करतात.
हे सुद्धा वाचा
महामोर्चात राज्यपाल रावणाच्या रूपात!
…यांचा शेवट केल्याशिवाय गप्प बसायचे नाही; उद्धव ठाकरेंचा मुंबईत शंखनाद
महाविकास आघाडीच्या अनेक महिला नेत्यांंचाही या मोर्चात समावेश दिसुन आला.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य राज्यपाल आणि भाजप नेत्यांनी केले होते. त्याविरोधात महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.