टीम लय भारी
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसैनिक यांच्यात मंगळवारी संघर्ष झाला होता. राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून हा वाद निर्माण झाला होता. याच कारणावरून भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचे सांगितले आहे ( Prasad Lad get threatening phone call).
लाड यांनी ट्विट करत ‘ मला धमकीचे फोन येणे हे हास्यास्पद आहे. परंतु वैचारिक पातळी सोडलेल्या लोकांकडून आपण अजून काय अपेक्षा करू शकतो?’ असा सवाल त्यांनी केला.
निलेश राणेंनी शिवसेनेला डिवचले
ठाकरे सरकारला उठलाय पोटसुळ : प्रविण दरेकर
खरंतर,मला धमक्यांचे फोन येणे हे हास्यास्पद आहे!
परंतु वैचारिक पातळी सोडलेल्या लोकांकडून अजून काय अपेक्षा करू शकतो आपण?
त्याअनुषंगाने सन्माननीय मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना याबाबत पत्र लिहून अवगत करणार आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे सरकारचे काम आहे!— Prasad Lad (@PrasadLadInd) August 25, 2021
त्याचबरोबर या सर्व प्रकरणावर आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबतची माहिती देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे सरकारचे काम आहे असे ही ते म्हणाले.
‘पोपटाचा प्राणही मुंबई महानगरपालिकेत’
Narayan Rane’s silence during Jan Ashirwad Yatra will be powerful: Chandrakant Patil
प्रसाद लाड हे शेवट पर्यंत नारायण राणेंच्या सोबत होते. लाड यांनी पोलिसांनी नारायण राणें सोबत गैर वर्तन केले. तसेच राणेंच्या हातातील जेवणाचे ताट पोलिसांनी हिसकावून घेतल्याचा आरोप सुध्दा केला होता.