सध्या महिला आशिया चषक स्पर्धा बांग्लादेश येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील भारतीय महिला संघाचा सामना सोमवारी (10 ऑक्टोबर) थायलंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध नियोजित करण्यात आला होता. या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम गोलंदाजी करत असताना थायलंडच्या महिला संघाला केवळ 37 धावांवर रोखले आहे. त्यानंतर .या छोट्याशा लक्ष्याचा पाठलाग करत असताना भारतीय महिला संघाने 9 विकेट्स राखत विजय मिळवला. शिवाय हे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारतीय महिला संघाने केवळ 6 षटके घेतली. यावेळी भारतासाठी एस मेघना हिने सर्वाधिक नाबाद 20 धावांची खेळी केली.
सोमवारी महिला टी20 आशिया चषक स्पर्धेत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना थायलंडला 15.1 षटकात 37 धावांत गुंडाळले. थायलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. त्याच्याकडून नानपत कोंचनारिओनकाई (12) या एका फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला.भारताकडून स्नेह राणाने 3 तर राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी 2 गडी बाद केले. मेघना सिंगला एक विकेट मिळाली. भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान आधीच पक्के केले आहे. या सामन्यात नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरही खेळली नाही. तिच्या जागी स्मृती मंदाना कर्णधार होती. तर, रेणुका सिंगच्या जागी मेघना सिंगचा संघात समावेश करण्यात आला होता.
हे सुद्धा वाचा
Phone Bhoot Trailer Out : कतरिना अन् जॅकी दादाची हॉरर कॉमेडी! ‘फोन भूत’ सिनेमाचा ट्रेलर आऊट
विशेष म्हणजे यावेळी भारताने हे लक्ष्य केवळ 6 षटकांत पूर्ण केल्याने भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठा विजय मिळवला आहे. आजवर भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक चेंडू राखत विजय मिळवला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाने 120 पैकी 84 चेंडू बाकी ठेवत सामन्यात विजय मिळवला. याआधी भारताने 2011साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात 58 चेंडू राखत विजय मिळवला होता.
टी20 मध्ये भारतीय महिला संघाचा सर्वात मोठा विजय: (चेंडू बाकी)
84 वि थायलंड, 2022
58 वि ऑस्ट्रेलिया, 2011
57 वि वेस्ट इंडीज, 2019
54 वि दक्षिण आफ्रिका, 2021
46 वि ऑस्ट्रेलिया, 2012