टीम लय भारी
मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते स्व. राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची काँग्रेसची जागा रिक्त झाली होती. त्यांच्या जागेवर काँग्रेसच्या रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र रजनी पाटील यांच्या विरोधात भाजपने संजय उपाध्याय यांना उभं केलं होत (BJP withdraws from Rajya Sabha candidature).
परंतु, काँग्रेसच्या विनंतीला मान देत भाजपने आता उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. रजनी पाटील यांची बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत विनंती केली होती. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी फडणवीसांची भेट घेतली होती.