31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयकितीही गोडसे जिंदाबादचा नारा दिला तरी गांधीजी मरणार नाहीत... : अतुल लोंढे...

कितीही गोडसे जिंदाबादचा नारा दिला तरी गांधीजी मरणार नाहीत… : अतुल लोंढे काँग्रेस नेते

संदिप रणपिसे : टीम लय भारी

मुंबई : गांधीजींच्या जयंती निमित्ताने काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. गांधींच्या पुण्यतिथी 30 जानेवारी ला कितीही गोळ्या झाडल्या आणि जंयती दिवशी, कितीही गोडसे जिंदा बादचा नारा दिला तरी गांधीजी मरणार नाहीत वा संपणार नाहीत कारण गांधीजी खरे प्रजाहीत रामाचे भक्त होते (Congress leader Atul Londhe targets opposition).

त्यांनी खर्या अर्थाने देशाला स्वंयम सिध्द केलं आत्मनिर्भर केलं आणि मोठ्यातल्या मोठ्या संकटाला लढण्याची शक्ती दिली ते बळ दिलं ज्या लोकांनी इंग्रजांसोबत मिळुन मुस्लीम लीग सोबत हात मिळवणी केली. या देशाचं विभाजन केले जे लोक अखंड भारताची गोष्ट करतात ते ईरान पर्यंत जात तेच लोक शेजारच्या राज्यांना द्वेष शिकवतात धर्माच्या नावाचा द्वेष शिकवतात.

Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बिगर मराठा नेत्याकडे जाणार ?

Congress : मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार

जातीच्या नावाने द्वेष शिकवतात उचनीचतेचा द्वेष शिकवतात तेच गोडसेंचे अनुयायी आहेत. आणि जे फक्त प्रेम सद्भावना अहिंसा आणि लोकांना धार्मिकतेच्या नावावर नाही तर भारताच्या नावावर म्हणजे आम्ही भारताचे लोक असं शिकवतात.

कितीही गोडसे जिंदाबादचा नारा दिला तरी गांधीजी मरणार नाहीत... : अतुल लोंढे काँग्रेस नेते

Mumbai Congress : मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीची लवकरच घोषणा, दिल्लीत हालचालींना वेग

Maharashtra bypolls: Six names in fray for Congress ticket from Deglur

आता निर्णय त्यांना घ्यायचाय गोडसे च्या बाजुने की गांधीच्या बाजुने त्यांना हुकुमशाही पाहीजे की लोकशाही. त्यांना धर्मनिरपेक्ष राष्ट्र हवाय की धर्मांतं राष्ट्र हवाय हा निर्णय त्यांनी करायचा आहे. गांधीवादींना त्या गोष्टी ने काही फरक पडणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी