राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीमुळे आरोपप्रत्यारोप अनेकदा पाहायला मिळतात. सत्ताधारी विरोधी पक्षावर तर विरोधी सत्ताधारी पक्षावर टीका करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्नी करुणा मुंडे यांनी केलेल्या आरोपामुळे ते चर्चेत आले होते. आता ते माजी मंत्री शालिनी पाटील (Shalini Patil) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे. (BJP) (janasngh)
धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
माजी मंत्री शालिनी पाटील या कॉंग्रेस नेते वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांनी कोणालाही न माहित असलेली माहिती पत्राद्वारे नमूद केली आहे. यामुळे संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून जाण्याची चिन्हे आहेत. त्यांनी धनंजय मुंडेंबाबत काही आरोप केले आहेत. ते पत्र शालिनी यांनी थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. धनंजय मुंडेंसह अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा देखील समावेश आहे.
पत्रामध्ये शालिनी यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे १०० लोकांना जवळ करून बाहेरून नर्तिकी आणायचे. या आरोपामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. याचसोबत छगन भुजबळ यांच्यावरही महाराष्ट्र सदनाचा मोठा घोटाळा केला असल्याचं पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यांच्या आरोपामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यामध्ये अजित पवार यांचाही समाचार घेतला आहे.
हे ही वाचा
‘देवेंद्र फडणवीस म्हणजे शूर्पणखा आम्ही शूर्पणखेचं नाक कापल्याशिवाय शांत बसणार नाही’
टीम इंडियाचा रिंकू नंबर वन फिनिशर होण्यामागे धोनीचा हात
राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ‘या’ नेत्यांना निमंत्रण
शालिनी पाटील यांनी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यासह अजित पवार यांच्यावर देखील आरोप केले आहेत. ‘अजित पवार यांनी तब्बल ७० हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. भाजपने तो घोटाळा लपवला आहे. २५ हजार कोटींचा युतीसाठी शिखर बॅंकेतील घोटाळा झाकला आहे’. असं शालिनी पाटील म्हणाल्या आहेत. यबरोबर त्यांनी एकनाथ शिंदे यांना देखील धारेवर धरलं आहे.
‘एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी अनेकदा वेळ मागितला मात्र तो वेळ त्यांनी दिला नाही. राज्यातील एकही मुख्यमंत्री माझ्यासबत असं वागले नाहीत. एकनाथ शिंदे यांचं हे वागणं अतिशय चुकीचं आहे’, त्यांच्या खुलास्याची चर्चा रंगू लागली आहे.