टीम लय भारी
पिंपरी: शिरूरचे खासदार कोल्हे व माजी खासदार आढळराव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुप्त संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांनाच विसर पडला असल्याचा टोला माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी लगावला आहे.( MP Amol Kolhe forgets election promises)
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये कोल्हे यांनी मतदारांना दिलेली आश्वासने त्यांनाच अडचणीची ठरताना दिसत आहे. त्यांचे पहिले आश्वासन होते की, हा अमोल कोल्हे मालिका विश्वातून निवृत्ती घेणार आणि सर्वकाल तुमच्या सेवेसाठी उपस्थित असणार. पुण्याच्या शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात येऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला तो शब्द सत्यात उतरवावा, असं खुलं आव्हान शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिलंय.
आढळराव म्हणाले, बैलगाडा शर्यतींसाठी खासदार कोल्हे यांना जाहीर आमंत्रण दिले होते. तुम्ही बैलगाडा शर्यतीसाठी या. तुम्ही निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी का होईना, लांडेवाडीत आमच्या घाटात या आणि घोडीवर बसा, असे आमंत्रण त्यांना होते. मात्र, ते आले नाहीत आणि येणार नव्हतेच, असे आढळराव म्हणाले.
हे सुद्धा वाचा
Dr. Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हेंना मतदारसंघात हवीय चित्रनगरी, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचंय; खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य
अमोल कोल्हेंच्या चित्रपटातील भूमिकेविरोधात संमिश्र राजकीय प्रतिक्रिया
अमोल कोल्हे हे देखील म्हणाले ज्या दिवशी बैलगाडा शर्यती सुरू होतील, तेव्हा हा तुमचा पठय़ा, शर्यतीतील पहिल्या बारीसमोर घोडी धरणार, हे त्यांचे दुसरे आश्वासन होते. मात्र, या दोन्ही आश्नासनांचे पालन त्यांच्याकडून झाले नाही. त्यावरून आढळराव व त्यांच्या समर्थकांकडून कोल्हे यांची मतदारसंघात खिल्ली उडवली जात आहे. तूर्त आढळरावांच्या टीकेवर खासदार कोल्हे यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही.