टीम लय भारी
मुंबई : विद्यमान सरकार गडगडणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘महाविकास आघाडी सरकार’ची बोचऱ्या शब्दांत संभावना केली आहे.
बहुमत सिद्ध करणे, अधिवेशन बोलविणे याबाबत सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिलेले आहेत. तरीही हे सरकार पायउतार होण्यास तयार नाही.
आता बहुमताला सामोरे गेल्यानंतर त्यांना घरी जावे लागेल, असे सांगत ‘जय श्रीराम… टाटा… बाय.. बाय..’ अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी सरकारची खिल्ली उडविली.
हे सुद्धा वाचा :
‘बंडखोर आमदार मस्त, आनंदी अन् समाधानी’
पुढील दीड महिना पर्यटकांसाठी ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची दारे राहणार बंद
एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचे दर्शन घेणार, अन् बहुमताला सामोरे जाणार