30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयप्रियंका गांधींना सन्मानाने तुरुंगातून सोडले नाही तर, महाराष्ट्रात काँग्रेस जेल भरो आंदोलन...

प्रियंका गांधींना सन्मानाने तुरुंगातून सोडले नाही तर, महाराष्ट्रात काँग्रेस जेल भरो आंदोलन करणार : नाना पटोले

टीम लय भारी

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराबद्दल देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना तेथील स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. प्रियंका गांधी यांच्या अटकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील संताप व्यक्त केला आहे (Nana Patole also expressed outrage over Priyanka Gandhi’s arrest).

प्रियंका गांधींना सन्मानाने तुरुंगातून सोडले नाही तर, काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन करणार. तसेच या सर्व कारवाईला केंद्र सरकार जबाबदार आहे. त्यांच्या इशाऱ्यावरच उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होत आहे, असे पटोले म्हणाले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा : नाना पटोले

मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमात केलेले विधान गंमतीत केले : नाना पाटोले

लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हिंसाचारात ९ जण ठार झाले तर अनेक जखमी झाले. या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी प्रियंका गांधी गेल्या असत्या तेथील पोलिसांनी प्रियंका गांधी यांना अटक केली. याच कृतीचा देशभरातून काँग्रेस पार्टी निषेध करताना दिसत आहे.

मोदी सरकार जनतेला चिटकलेला ‘जळू’ : नाना पटोले

Maharashtra Congress leader Ashish Deshmukh in hot water after audio clip surfaces

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी