- टीम लय भारी
सिलचर : 26 जुलै च्या रात्री भारताच्या 2 पूर्वेकडील राज्यातील सीमारेषे,सिलचर वरून झालेला संघर्षाचे बाबतीत वक्तव्य करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गृह मंत्री अमित शाह यांना दूषणे दिली. (Mizoram asam border conflict is failure of home minister)
काही आठवड्यापासून दोन्ही राज्यांत सीमारेषेवरुन संघर्ष होत होते, त्यानंतर अमित शहा पूर्वेकडील 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि या अंतर्गत विषयांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर दोनच दिवसांनी ही घटना घडली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भास्कर जाधवांना फोन; चिपळूण प्रकरणाबाबत म्हणाले…
महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यात राज्यसरकार बांधणार संरक्षक भिंत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनुक्रमे आसाम आणि मिझोरम, हिमंता बिस्वा सर्मा आणि झोरमथंगा या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि वादग्रस्त सीमेवर शांतता प्रस्थापित करुन शांततेत तोडगा काढावा, असे आवाहन केले. आसाममधील बराक व्हॅलीचे काचार, करीमगंज आणि हैलाकांडी हे जिल्हे मिझोरमच्या आयझाल, कोलासिब आणि ममित या तीन जिल्ह्यांसह 164 किलोमीटर इतक्या लांबीची सीमा आहे.
रोमवरी रात्री झालेल्या आसाम मिझोराम मधील वादा वादीत 5 मृत्यू व जवळपास 60 हुन अधिक पोलिसांस दुखापत झाली आहे.
आसाम सरकारच्या निवेदनात म्हटले आहे की, हॉस्पिटलमध्ये भरती केलेले आणि आयसीयूमध्ये असलेले कॅचर एसपी निंबाळकर वैभव चंद्रकांत यांच्यासह 50 हून अधिक पोलिस जखमी झाले आहेत.
दोन आठवड्यांपासून पालघर जिल्ह्यातील वसई विरार मध्ये लसीकरण बंद!
Six Assam cops killed, 80 hurt in border clash with Mizoram
देशातील राज्यांत एकमेकांविषयी द्वेष पेरला गेला आहे, या कामकाजात गृहमंत्री म्हणून अमित शहा अपयशी ठरले आहेत. असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले.सिलचरमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता , जखमी पोलिसांना भेटले आणि त्यांची विचार पूस केली.