टीम लय भारी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चार IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत ( Uddhav Thackeray transfers four IAS officers ) . यांत राजीव जलोटा, ए. व्ही. आर. श्रीनिवास, सौरभ विजय, जलाजी शर्मा यांचा समावेश आहे.
राजीव जलोटा यांची नियुक्ती उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव पदावर करण्यात आली आहे. श्रीनिवास यांची नियुक्ती गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव पदावर करण्यात आली आहे. ते माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते.
हे सुद्धा वाचा
मंत्रालयातील ‘या’ IAS अधिकाऱ्याने ‘कोरोना’च्या लढाईत उपसले प्रचंड कष्ट, आता झाली बदली
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव पदावर करण्यात आली आहे. जलाजी शर्मा यांची नियुक्ती नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर करण्यात आली आहे.
वरिष्ठ IAS अधिकारी असलेल्या राजीव जलोटा यांच्याकडे मंत्रालयातील ‘कोरोना’ कक्षाची जबाबदारी होती. परंतु त्यांच्याकडे कोणत्याही खात्याची जबाबदारी नव्हती. आता त्यांना नव्याने उच्च व तंत्र शिक्षण खाते देण्यात आले आहे.