नगर जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लक्ष्मी माता मंदिरात गणपती बाप्पाची आरती सुरू असताना काही समाजकंठकांनी एकत्र येत मंदिरावर तुफान दगडफेक केली. यावेळी त्यांनी गणपतीच्या मुर्तीची विटंबना केली, शिवाय पुजाऱ्यांना मारहाण सुद्धा केली. या संपुर्ण प्रकरणात दोन पुजारी गंभीर जखमी झाले असून त्यांना नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपुर्ण प्रकरणानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांकडून या घटनेचा तीव्र विरोध दर्शवण्यात येत आहे. मोठ्या संख्येने एकत्र येत जमावानेच हल्ला चढवल्याचे सांगण्यात येत आहे. यावर सदर आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील पोखर्डी शेंडी गावात 4 सप्टेंबर रोजी लक्ष्मी माता मंदिरात गणपती बाप्पाची आरती सुरू होती. आरती सुरू असताना अचानक 40 ते 50 लोकांच्या जमावाने मंदिरावर दगडफेक केली, शिवाय मंदिरातील पुजाऱ्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली. यामध्ये दोन पुजारी गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सदर हल्ला गावातील पोलिस पाटील यांच्या मदतीनेच करण्यात आल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हे सुद्धा वाचा…
Hemant Soren : ‘अखेर’ हेमंत सोरेन विश्वास दर्शक ठराव जिकंले
Asia Cup 2022: खेळात चुक होणे ही स्वाभाविक गोष्ट; विराट कोहलीने केली अर्शदीप सिंहची पाठराखण
Rahul Gandhi : ‘त्या’ एका चुकीच्या शब्दासाठी भाजपने राहूल गांधींची शाळा घेतली
या हल्ल्याविषयी सांगताना पुजारी म्हणाले, हल्ला करणारे सर्व लोक कागदोपत्री जातीने हिंदू आहेत पण त्यांच्या पूजा पद्धतीत बदल करून त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे व आरती बंद करा असे स्थानिक लोकांना सांगत मारहाण केली सदरील हल्लेखोरानी नागापूर अरंगाव, जेउर शेंडी व पोखर्डी येथील सर्वांनी जमाव करत हल्ला केला, असे म्हणून त्यांनी हल्ल्याखोरांविषयी सांगितले.
या प्रकरणी स्थानिकांनी हल्लेखोरांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ सर्व आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी अन्यथा याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटतील मोर्चे, निदर्शने निघतील असा स्थानिक गावकऱ्यांकडून प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे.