31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईडॉ. बाबासाहेबांच्या घटनेमुळेच दिशा मिळाली...असे का म्हणाले मनोज जरांगे-पाटील

डॉ. बाबासाहेबांच्या घटनेमुळेच दिशा मिळाली…असे का म्हणाले मनोज जरांगे-पाटील

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळेच या देशाला दिशा मिळाली. त्यांच्या विचारांशिवाय वंचितांना न्याय मिळू शकत नाही. ते विचार घेणं अत्यंत गरजेचं आहे.’ असे मराठा आरक्षण आंदोलक जरांगे-पाटील यांनी सांगत, ‘ मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा सेवक आहे. सर्वसामान्यांचा सेवक आहे. कारण ते रक्त आपल्यात आहे.’ असेही स्पष्ट केले. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी अंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोनदा 26 दिवस आंदोलन केले. त्यातील दुसरे नऊ दिवसांचे उपोषण अन्न आणि पाण्याविना करण्यात आले. सगळ्यांचे मनोज जरांगे-पाटील हे गळ्यातले ताईत झाले. त्यांची तुलना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जात आहे.

मनोज जरांगे-पाटील यांच्या संदर्भातील अनेक लेख, ग्राफिक्स सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळेच या देशाला दिशा मिळाली. त्यांच्या विचारांशिवाय वंचितांना न्याय मिळू शकत नाही. ते विचार घेणं अत्यंत गरजेचं आहे.’ असे जरांगे-पाटील यांनी सांगत, ‘ मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा सेवक आहे. सर्वसामान्यांचा सेवक आहे. कारण ते रक्त आपल्यात आहे.’ असेही स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटलांनी आज जालन्यातील खासगी रुग्णालयात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले. तसेच, डॉ. बाबासाहेबांनी समाजाला न्याय मिळवून दिला, त्यामुळे त्यांच्याशी तुमची तुलना केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुमची तुलना करतात. ही तरुणांची भावना आहे. या तरुणांबद्दल तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांना विचारण्यात आला. ‘हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे. मी कोणात ढवळाढवळ करणार नाही. पण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा सेवक आहे. सर्वसामान्यांचा सेवक आहे. कारण ते रक्त आपल्यात आहे.’ असे मनोज जरांगे म्हणाले.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळेच या देशाला दिशा मिळाली. त्यांच्या विचारांशिवाय वंचितांना न्याय मिळू शकत नाही. ते विचार घेणे  अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय माणसाची किंवा एखाद्या समूहाची प्रगती होणार नाही. नाहीतर प्रगती खुंटलीच म्हणून समजा,’ असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

आपण बेमुदत उपोषण स्थगित केले असले  तरीही आताही आंदोलन चालू आहे. आंतरवालीसह महाराष्ट्रात साखळी उपोषण चालू आहे. मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याशिवाय ते थांबणार नाही. पुन्हा एक विनंती आहे की उद्रेक किंवा कायदा मोडेल असे  कृत्य करायचे  नाही”, असे आवाहनही त्यांनी मराठा आंदोलकांना केले.

हे सुद्धा वाचा

मराठा आरक्षणावरून आत्महत्येचं सत्र सुरूच
दिवाळीआधी भारताची दिवाळी; जीएसटीतून मिळाले 1.72 लाख कोटी
अंबानींना धमकी देणारे आहेत तरी कोण?

‘डिसेंबरपासून प्रत्येक गावागावात पुन्हा महाराष्ट्रभर साखळी उपोषण शांततेत सुरू करायचे  आहे. न्यायाचा दिवस जवळ आला आहे. शेतीतले कामे करत असताना आपल्या लेकरांच्या भविष्याचा विषय डोक्यात ठेवायचा आहे’, असेही मनोज जरांगे म्हणाले. महाराष्ट्र दौऱ्याबाबत आज कार्यक्रम आखला जाईल. आपण पुन्हा एकदा मराठा समाजाचा आशीर्वाद घ्यायला जायचे आहे. २४ डिसेंबर आरक्षणाची अंतिम तारीख आहे. तर दौरा उद्या-परवापासूनच सुरू होणार आहे,’ असेही ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी