टीम लय भारी
मुंबई : राष्ट्रवादी कॅंग्रेसचे मंत्री मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आता जनता दरबार घेणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जनता दरबार बंद होता.
मात्र, आता सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे मंत्री जनता दरबार सुरु करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. श्री. शरद पवार साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जनता दरबार उपक्रमांतर्गत सोमवार, दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी गृहनिर्माण मंत्री ना. @Awhadspeaks दुपारी २ ते ४ यावेळेत उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. pic.twitter.com/FR06rRwWqy
— NCP (@NCPspeaks) March 31, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड दुपारी २ ते ४ यावेळेत उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. ४ एप्रिल २०२२ रोजी जनता दरबार घेण्यात येणार आहे. जनता दरबाबाराचं वेळापत्रक ट्विटरवर जाहीर करण्यात आलं आहे.
सोमवार ते शुक्रवार या काळात पक्षाचे मंत्री जनतेच्या तसेच कार्यकर्त्यांच्या कामांसाठी उपस्थित राहतील असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
हे सुध्दा वाचा :
https://indianexpress.com/article/cities/mumbai/sena-ncp-soft-on-bjp-uddhav-pawar-7845189/
पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचं कौतुक झाले, पण राष्ट्रवादीचा मोदींवर पलटवार