टीम लय भारी
मुंबई : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज ट्विटर च्या माध्यमातून शरद पवारांवर ताशेरे ओढले आहेत. शरद पवारांचे ओबीसी समाजावर प्रेम येते कुठून असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी त्याबद्दल एक व्हिडीओ शेयर केला आहे(Gopichand padalkar tweeted a video talking about sharad pawar).
‘ज्यांनी उभ्या आयुष्यात फक्त पुतण्या, मुलगी आणि नातवाचंच भलं केलं आहे, त्या शरद पवारांचं ओबीसी प्रेम कसं उफाळून आलं? यामागे काय हेतू आहे?’ असा सवाल गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना केला.
पंकजाताईंनी आपल्याच कार्यकर्त्यांना झापले, ‘मुर्खांनो’ असा केला उल्लेख
बदलीसाठी प्रांताधिकाऱ्याने महिला तलाठ्याकडे केली शरीरसुखाची मागणी
यावेळी त्यांनी असेही म्हंटले की, शरद पवार कोणतेही काम हेतुशिवाय करत नाहीत. त्याच बरोबर त्यांचा खरा हेतुसुद्धा ते कधी दाखवत नाहीत. पुढे ते प्रश्न करतात, केंद्राने ताट वाढले आहे हे खरे आहे, तुमचे हात बांधले आहेत हे सुद्धा खरे आहे. पण हे हात कशामुळे बांधले गेलेत?
ज्यावेळी शरद पवार सत्तेवर आले त्यावेळी त्यांनी मराठा समाजाचे आरक्षण घालवल्याचा आरोप यावेळी पडळकरांनी केला. शरद पवारांनी मागितलेल्या 2011 सालच्या जनगणनेच्या अहवालाबद्दल पडळकरांनी आपले मत व्यक्त केले.
ज्यांनी उभ्या आयुष्यात फक्त पुतण्या-मुलगी-नातवालाच मोठं केलंय त्या #शरद_पवारांचं आज अचानक #ओबीसीप्रेम कसं उफाळून आलंय? यामागं काय हेतु आहे?#OBC @BJP4Maharashtra pic.twitter.com/CcnRPNnv8d
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) August 16, 2021
‘डिजिटल मीडिया’वर सक्ती नको, उच्च न्यायालयाचा आदेश
Will pressure Centre to change OBC Bill, need caste-based census: Sharad Pawar
त्या अहवालात जो घोटाळा आहे तो मनमोहन सिंग यांच्या कालावधीत झाला असून शरद पवार सुद्धा त्यात भागीदार आहेत असे आरोप करत गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, चूक तुमची, पाप तुमचं आणि बोंब मात्र मोदी सरकार विरोधात ठोकता आहेत.
मराठ्यांसाठी कोणत्याच सुविधा करायची तयारी ठेवत नसाल तर जातनिहाय जनगणना अहवाल मागता कशाला असे प्रश्न विचारत शरद पवारांनी फक्त भूलथापा मारत बहुजनांचे लक्ष विचलित करणे चालवले आहे असे पडळकर म्हणाले.