टीम लय भारी
नवी दिल्ली :- राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे हे काही नवीन नाही आहे. पण सध्या देशातील राजकारणात रोज नवीन चर्चा रंगत आहेत. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे (Nusrat Jahan Lok Sabha membership cancellation Demand).
भाजपाच्या खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष यांना पत्र लिहल आहे. या पत्रात नुसरत जहाँचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. (Nusrat Jahan Lok Sabha membership cancellation Demand).
शरद पवार, प्रशांत किशोरांच्या दिल्लीतील भेटीनंतर ‘या’ चर्चांना उधाण
अकोला शहर व पातूर शहरात बच्चू कडू पठाण वेशांतर करून फिरले आणि…
संघमित्रा मौर्य यांनी या पत्रात असे लिहले आहे. की, नुसरत जहां यांची वर्तणूक मर्यादेचा भंग करणारी आहे. लग्नाच्या मुद्यावरून नुसरत जहाँ यांनी आपल्या मतदारांना फसवले आहे. शिवाय यामुळे संसदेची प्रतिष्ठाही कलंकित झाली आहे.
हा विषय संसदेच्या नीतिशास्त्र समितीकडे पाठवला पाहिजे. तसेच चौकशी करून नुसरत जहाँवर कारवाई केली पाहिजे. अशी मागणी संघमित्रा मौर्य यांनी केली आहे. (Nusrat Jahan Lok Sabha membership cancellation Demand).
संघमित्रा मौर्य यांनी असे ही नमूद केले आहे. नुसरत जहाँ संसदेत पहिल्या दिवशी नव्या नवरीप्रमाणे तयार होऊन येणे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुसरत जहाँच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावल्याचा उल्लेख केला आहे.
लाजीरवाणे : ‘नरेंद्र मोदींचे कौतुक करणारे बॅनर लावा’; केंद्र सरकारचे विद्यापीठ, महाविद्यालयांना आदेश
Nusrat Jahan’s marital status questioned again, BJP leader calls for probe
काही दिवसांपूर्वी नुसरत जहाँ म्हणाल्या होत्या की, परदेशी भूमी असल्याने तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार आमचा विवाह अवैध आहे. यासोबतच हा एक दोन वेगळ्या विभिन्न धर्मीय व्यक्तींमधील विवाह आहे. त्यामुळे भारतात कायदेशीर मान्यता मिळवण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही.
त्यामुळे कायदेशीर रित्या हा विवाह वैध नाही. हे केवळ एक नाते किंवा लीव्ह इन रिलेशनशिप (Live In Relationship) आहे. त्यामुळे आम्हाला वेगळे होण्यासाठी कोणत्याही घटस्फोटाची गरजच नाही. असे नुसरत जहाँ स्पष्ट म्हणाल्या होत्या.
सुरुवातीपासून नुसरत जहाँचे लग्न वादात आहे. नुसरतने निखिल जैनसोबत लग्न केले होते. तेव्हा बंगालच्या मौलानांनी नुसरत विरोधात फतवा काढला होता. तसेच संसदेत सिंदूर लावून गेल्यावरही वाद निर्माण झाला होता.