टीम लय भारी
मुंबई: राज यांनी ट्वीट करत एक पोस्ट केली आहे. यामध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी, “उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थलांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार,” असं म्हटलं आहे. राज यांनी, (Raj Thackeray) महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. “आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!”, “महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना,” असंही म्हटलं आहे. Raj Thackeray criticize maha Vikas Aghadi
#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राजकारण होत आहे. राज्याचे राजकारण तापले असताना उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. यावर कृतीवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया देत योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे.
हे सुद्धा वाचा:
‘सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व’ राज ठाकरेंच्या व्यंगचित्राची पुण्यात बॅनरबाजी
Nearly 11,000 Loudspeakers Removed From Religious Places In UP