टीम लय भारी
मुंबई:- शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून नाव न घेता रोख प्रामुख्याने नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र, पडळकर आणि प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून राऊतांनी ‘बाटग्यांवरुन’ केलेला हल्लाबोल नितेश राणेंना चांगलाच झोंबला आहे. त्यांनी राऊतांना प्रत्त्युत्तर म्हणून ‘शिवसेनेच्या बाटग्यांची यादी!, असे म्हणत शिवसेनेमधल्या आयरामांची यादी प्रसिद्ध केली आहे (Sanjay Raut attack through Saamana then nitesh rane has replied).
भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केली होती. त्यांनी नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख प्रामुख्याने नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र, पडळकर आणि प्रसाद लाड यांच्याकडे होता. यावर आता नितेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
आम्हीही अशी थप्पड देऊ की समोरील व्यक्ती आपल्या पायांवर पुनः उभी राहू शकणार नाही’, उद्धव ठाकरे
नितेश राणे यांनी ट्विटमधून संजय राऊतांना उत्तर दिले आहे. शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे. पण थोडी माहितीसाठी, असे म्हणत त्यांनी शिवसेनेतील आयारामांची काही नावे सांगितली आहेत.
सचिन आहीर – bks ची जबाबदारी
राहुल कनाल – शिर्डी संस्था
आदेश बांदेकर – सिद्धिविनायक संस्था
उदय सामंत – कॅबिनेट मंत्री
अब्दुल सत्तार – मंत्री
प्रियांका चतुर्वेदी – खासदार
शिवसेनेतील बाटग्यांचे महामंडळची यादी तशी लांब आहे.. पण थोडी माहिती साठी..
सचिन आहीर – bks ची जबाबदारी
राहुल कनाल – शिर्डी संस्था
आदेश बांदेकर – सिद्धिविनायक संस्था
उदय सामंत – कॅबिनेट मंत्री
अब्दुल सत्तार – मंत्री
प्रियांका चतुर्वेदी – खासदार
यादी मोठी आहे..
इथे कुठेही..— nitesh rane (@NiteshNRane) August 2, 2021
नितेश राणे यांनी दुसरे ट्विट संजय राऊतांना टॅग करत केले आहे. डाके..रावते..रामदास कदम..शिवतारे..राजन साळवी, सुनील शिंदे दिसणार नाहीत सारखे जुने सैनिक दिसणार नाहीत..स्वतः पवारांची लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषण द्यायची!! असे ट्विट करत नितेश राणे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
डाके..रावते..रामदास कदम..शिवतारे..राजन साळवी, सुनील शिंदे दिसणार नाहीत सारखे जुने सैनिक दिसणार नाहीत..
स्वतः पवारांची लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषण द्यायची!! @rautsanjay61— nitesh rane (@NiteshNRane) August 2, 2021
राऊत अग्रलेखात काय म्हटले होते?
भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बाटग्यांना येथे स्थान नव्हते. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे (Sanjay Raut said that there was a generation of pro-Hindu ideologues in this party).
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ
शिवसेनेच्या स्थापनेपासून सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला असेल तर तो आपल्यातल्याच बाटग्यांनी. बाटगा जरा जोरातच बांग देतो व आपणच कसे कडक निष्ठावान आहोत यासाठी लक्ष वेधून घेत असतो. प्रसंगी तो जिभेवाटे गटारही मोकळे करून सर्वत्र दुर्गंधी पसरवतो. या दुर्गंधीमुळे आज कमळाचे पावित्र्य व मांगल्य साफ कोमेजून गेले आहे.
1992 च्या ‘बाबरी’ दंगलीत हेच शिवसेना भवन हिंदुत्वाच्या स्वाभिमानाने खंबीरपणे मराठी व हिंदूंचे रक्षणकर्ते म्हणून उभे होते. तेव्हा आजचे हे बाटगे दंगलखोर पाकड्यांना घाबरुन घरातच गोधड्या भिजवत होते. आम्ही बाबरी पाडली नाही हो, असा आक्रोश करून बाबरास पाठ दाखवून पळणारे आज या बाटग्यांच्या जीवावर शिवसेनेशी ‘सामना’ करु पाहतात ही आडवाणी – अटलबिहारींच्या महान पक्षाची घसरगुंडी आणि शोकांतिका नाहीतर काय? असे संजय राऊत यांनी अग्रलेखात लिहिले आहे (Sanjay Raut says Advani – Atal Bihari what if not the collapse and tragedy of great party).