31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयगेली नऊ वर्षे फक्त मन की बात, काम की बात काहीच नाही;...

गेली नऊ वर्षे फक्त मन की बात, काम की बात काहीच नाही; संजय राऊतांची मोदींवर सडकून टीका

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईतील वज्रमुठ सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. मोदींचे नाव न घेता ते म्हणाले, या देशाचा एकमेव पंतप्रधान पाहिला जो गेली नऊ वर्षे मन की बात करत आहे, पण काम की बात करत नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा दिल्लीतील नेत्यांचा डाव असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

संजय राऊत म्हणाले, आज सकाळी एकत होतो, भाजपचे मुंबईतील एक नेते सांगत होते मुंबईतील एका लहान मैदानात वज्रमुठ सभा होत आहे. आता ही गर्दी पाहून सांगतो, त्या नेत्याचे डोळे चीनी आहेत. काल देशाचे गृहमंत्री मुंबईत होते. आज आहेत की नाही माहित नाही, बहुतेक सभा एकायला येऊन बसले असतील. आमची ताकद पहा हम सब एक है, असे राऊत म्हणाले.
राऊत पुढे बोलताना म्हणाल, सर्वांना एकच अजित पवारांचे आकर्षण आहे. सगळे म्हणत होते दादा सभेला येणार का ? मी म्हणालो दादा येणार, दादा बोलणार आणि जिंकून जाणार. अजित पवारांवर राऊत यांनी या सभेत स्तुतीसुमने उधळली.
हे सुद्धा वाचा

मिशी कधी काढणार? आमदार संतोष बांगर यांना जयंत पाटलांची विचारणा

अरे पचास खोका तुमने खाया, महाराष्ट्रने क्या पाया; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

शिंदे सरकार जाणार की राहणार? सुप्रीम कोर्टाचा फैसला कधी ? निकालाबाबत पाच न्यायाधीशात सहमती नसेल तर?  

पंतप्रधान मोदींवर टीका करताना राऊत म्हणाले. काल आणखी एक इव्हेंट झाला मन की बात. या देशाचा एकमेव पंतप्रधान पाहिला जो नऊ वर्षे मन की बात करतोय काम की बात करत नाही. महाराष्ट्राचे लचके तोडायचे काम दिल्लीतून सुरु आहे. त्यासाठी शिवसेनेवर घाव घातला. शिवसेनेवर घाव घातल्याशिवाय मुंबईचा लचका तोडता येणार नाही हे त्यांना माहित होते. मात्र आज शिवसेनेसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, दलित सर्व आहेत.

अनिल देशमुख, भुजबळ आणि मी आत जावून आलो आता आम्ही घाबरत नाही. चोर लफंगे वॉशिंगमशीन मध्ये धुवून भाजपमध्ये घ्यायचे, बोगस देशभक्तांची फौज घेऊन ते आमच्याविरोधात लढायला आले आहेत. हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मील जायेगा हेच या वज्रमुठीतून सांगायचे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी