टीम लय भारी
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ बरखास्त करायचे तर ते आधीच करायला हवे होते. आता त्यांचे टायमिंग चुकलेय, अशी टीका भाजपचे खासदार संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) केली आहे. तातडीने महामंडळाचे पुनर्गठन करून मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अशोक चव्हाण यांनी समाजातील तज्ज्ञ लोकांची समिती नेमून सुप्रीम कोर्टातील लढाईसाठी चर्चा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. ज्या अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजासाठी बलिदान दिले, त्यांच्या नावाने असलेल्या महामंडळाचे नेतृत्व त्यांचेच चिरंजीव सक्षमपणे करत असताना, ते महामंडळ बरखास्त का केले? सरकारचा तो अधिकार असेलही, पण ही वेळ नव्हती. समाजात याबाबत आक्रोश निर्माण झाला आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.