टीम लय भारी
मुंबई : महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावावी अशी विनंती राज्यपालांना करत होते. पण तसे झाले नाही. मात्र नवीन सरकार आल्यावर अध्यक्षांनी निवडणूक त्वरित लावली. तेही बंडखोर आमदारांच्या निलंबनासंदर्भात प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतांना !असो जनता जनार्दन सब जानती है! अशी कमेंट माजी शिक्षण मंत्री प्रो.वर्षा गायकवाड यांनी व्टिटरवर केली आहे.
महाविकास आघाडी सरकार असतांना नाना पटोले यांनी विधासभा अध्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दीड वर्षांहून अधिक काळ विधानसभेला अध्यक्ष नव्हता. अध्यक्ष निवडी बाबत वारंवार राज्यपाल कोश्यारींना पत्र पाठवण्यात आले. मात्र राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या त्या पत्रांना केराची टोपली दाखवली. त्यामुळे महाविकास आघाडी मधील नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे.
हे सुध्दा वाचा:
राहूल नार्वेकर ठरले सर्वात ‘तरुण‘ विधासभेचे अध्यक्ष
जयंत पाटील यांनी राज्यपालांना ‘गोंजारत‘ चिमटे काढले!
‘हरि नरके खालच्या जातीतले; म्हणून त्यांच्या शेजारी घर करु नका‘