टीम लय भारी
मुंबई: दिवाळीमध्ये नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावला, पण दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यार वसुलीचे आणि फडणवीसांच्या इशाऱ्यावर केंद्रीय यंत्रणा काम करत असल्याचा आरोप केला होता(Nawab Malik’s response to Devendra Phadnavis hint
)
तसेच नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीसांचा सचिन वाझे असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर हल्लाबोल करत दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे.
नवाब मलिकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीची आवश्यकता : प्रवीण दरेकर
फडणवीसांच्या इशाऱ्यावरच राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू, नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर राज्यातील ड्रग्जचा कारभार सुरु होता. फडणवीसांचा सचिन वाझे हा नीरज गुंडे आहे. नीरज गुंडे सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या, वसुलीचे काम पाहत होता असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. मलिकांच्या आरोपांवर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं.
यावेळी फडणवीसांनी नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सांगत त्यांच्याविषयी पुरावा असल्याचा दावा केला आहे. दिवाळीनंतर मोठा धमाका करणार असल्याचा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
धनंजय मुंडे यांनी दिला भावी अधिकाऱ्यांना कानमंत्र
Will expose Nawab Malik’s ‘underworld links’ post Diwali: Devendra Fadnavi
फडणवीस नक्की काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांचे आरोप फेटाळून लावत असताना फडणवीसांनी मलिकांनाच इशारा दिला आहे. नवाब मलिकांनी दिवाळीत लवंगी फटाका लावला आहे. मात्र मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे अंडर्वल्डशी संबंध आहेत त्यांनी माझ्याशी बोलू नये. माझ्याकडे नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे अनेक पुरावे आहेत. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांना हे पुरावे देणार असून दिवाळीनंतर मोठा धमाका करणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
नवाब मलिकांचे आरोप काय?
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर त्यांचा सचिन वाझे म्हणजे नीरज गुंडे वसुली करत होते. नीरज गुंडे हे केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालांमधून फिरत आहेत. समीर वानखेडे यांना देखील वसुली करण्यासाठी बदली करुन आणले. फडणवीस मुख्यमंत्री असताना नीरज गुंडे नावाचा व्यक्ती हा राज्यातील पोलीस बदल्यांमधील वसुली, ड्रग्जचा व्यवसाय आणि सर्व केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालयात त्याची उठ बस होती असा आरोप मलिकांनी केला आहे.