35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीय'भाजपा लबाड, मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्यांना फोन केलेला नाही'

‘भाजपा लबाड, मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्यांना फोन केलेला नाही’

टीम लय भारी

मुंबई : आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपर्क साधल्याची माहिती समोर आली. परंतु आता शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत यांच्याकडून या बातमीचे खंडन करण्यात आले आहे. भाजपा लबाड आहे, मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्याला किंवा व्यक्तीला फोन केला नसल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपली सत्ता धोक्यात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःहून दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली. परंतु उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत भाजपच्या कोणत्याही नेत्याशी संपर्क साधलेला नाही. ही भाजपची कूटनीती असून, भाजपकडून ही फालतुगिरी करण्यात येत आहे. शिवसेना भाजप करत असलेल्या कोणत्याही गोष्टींना भीक घालणार नाही, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.

आम्ही शिवसैनिक येणाऱ्या प्रत्येक संकटांना सामोरे जाऊ. भाजप लबाड आहे. म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडून पसरविण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे जे बोलतात, ते खुलेआम बोलतात. कोणीही गैरसमज करून घेऊ नये. असे विनायक राऊत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन

‘शिंदे साहेब सेना सोडून जाऊ नका’

फुटीर आमदार अनिल बोरनारे मलिदा खाणारे, शिवसेना मेळाव्यात चंद्रकांत खैरेंचा घणाघात !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी