32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयमनीषा कायंदेंचा भाजपवर घणाघात ,सत्ता गेली की माणसं बिथरतात

मनीषा कायंदेंचा भाजपवर घणाघात ,सत्ता गेली की माणसं बिथरतात

टीम लय भारी

मुंबई:- देशात कोरोना पसरण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचे वक्तव्य लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.काँग्रेसचे खासदार, आमदार व कार्यकर्ते चांगलेच आक्रामक झाले आहेत. दरम्यान,शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.(Manisha Kayande’s attack on BJP)

नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याने नाराज झालेल्या काँग्रेसने भाजपच्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांचे आंदोलनही सुरू आहेत. या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपने दिला आहे.  या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले होते. यामुळे मुंबईतील काही ठिकाणी नागरिकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला होता.

आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. पोलिसांनी आज देवेंद्र फडणवीसांच्या  सुरक्षेसाठी पोलिस फौजफाटा तैनात केला होता. पण याचवेळी रक्षणकर्त्या महिला पोलीसांच्या हाताचा चावा भाजप महिला कार्यकर्त्याने घेतला. ही संस्कृती कुठली? ही भाजपची संस्कृती आहे का, ही भाजपा अटलजींची भाजपा आहे का असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा

आमदार मनिषा कायंदेंचा टोला, स्टंटबाज नेते किरीट सोमय्या सपशेल आपटले

नितेश राणेंना जामीन नाकारल्यानंतर मिलिंद नार्वेकरांचे ट्वीट, म्हणाले…

राणे कुटुंबाला आता तरी याची जाणीव होईल,शिवसेनेचा टोला

Wardha illegal abortion case: Will seek appointment of public prosecutor with medical knowledge, says Sena leader

सत्ता गेली की इतकं माणसाने बिथरावं ? नेमकी काय मानसिकता आहे ?असं पुन्हा कोणी करू नये, कराल तर याद राखा शिवसेना पोलिसांच्या पाठशी आहे असा इशारा मनीषा कायंदे यांनी दिला. त्याचप्रमाणे पोलिसांना चावा घेणे ही कुठली नौटंकी हे फडणवीस यांनी सांगावे असं प्रश्न उपस्थित करत, महाराष्ट्र संस्कृतील न मानणारे भाजप आहे. मुंबईकरांना भाजपमुळे जो त्रास झाला ते मुंबईकर विसरणार नाही अशी टीका पटोले यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी