टीम लय भारी
मुंबई : ओबीसी नेत्यांची शुक्रवारी मुख्यंत्र्यांसोबत बैठक झाली. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे (Gopichand Padalkar write letter to the Chief Minister).
या पत्रातून पडळकर यांनी छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार व संजय राठोड या नेत्यांवर निशाणा साधला आहे. या ‘दिग्गज’ नेत्यांचा समावेश असलेली एक समिती गेल्या वर्षी ‘महाविकास आघाडी सरकार’ने स्थापन केली होती. ओबीसींच्या समस्यांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी ही समिती नेमली होती. पण ही समिती अदृश्य झाल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.
समितीचा शोध घेण्यासाठी आम्ही पोलिसांत तक्रार करू. कार्यतत्पर असलेले पोलिसही लगेच कारवाई करतील, अशा शब्दांत पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची मागणी, 1 लाख कोटी रकमेचा वापर सामान्य लोकांसाठी करा
OBC reservation in Maharashtra: Collect data soon, state tells panel
पडळकर यांनी पत्रात म्हटले आहे की, ही अदृश्य व हरवलेली उपसमिती नेमकी कुठे आहे . हे शोधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नव्याने टास्क फोर्सची स्थापना कराल का अशी असा प्रश्न केला आहे.