33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयजयंत पाटील मराठवाड्यातील पुरग्रस्तांच्या मदतीला धावले

जयंत पाटील मराठवाड्यातील पुरग्रस्तांच्या मदतीला धावले

टीम लय भारी

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांचे शनिवारचे नियोजित कार्यक्रम रद्द केले. त्यांनी नुकसानग्रस्त मराठवाड्याकडे धाव घेतली असून चाळीसगाव, औरंगाबाद भागातील पूरपरिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत (Jayant Patil rushed to the aid of flood victims in Marathwada).

मागील दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी दरड कोसळली होती तर बर्‍याच गावांमध्ये पुराचे पाणी घुसुन घरांचे नुकसान झाले होते. तर दुसरीकडे या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांचे मानले आभार

जयंत पाटीलांनी सांगितले मोदींच्या आणि पवारांच्या भेटीचे नेमकं कारण

मराठवाड्यातील या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी शनिवारी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.

जयंत पाटलांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची उडवली खिल्ली

Many ready to return to NCP, says Jayant Patil

Jayant Patil flood victims in Marathwada
जयंत पाटील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले

दौऱ्यादरम्यान जयंतराव पाटील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत तर झालेल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यानंतर मंत्री जयंतराव पाटील औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. दौऱ्यादरम्यान चाळीसगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभीकरणाचे काम सुरू असताना उत्खानात बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी सापडल्या. असे ट्ववीट जयंत पाटील यांनी केले आहे (This tweet has been made by Jayant Patil).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी