टीम लय भारी
नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा खास सण असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्याचा कोप होऊ नये म्हणून त्याला शांत करण्यासठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात (Narli Pournima is a special festival of the Koli brothers).
तसेच या दिवशी खास करून नारळापासून पदार्थ बनवले जातात. या सणाला बनवले जाणारे खास पदार्थ म्हणजे नारळी भात, नारळाच्या वड्या, ओल्या नारळाच्या करंज्या, खोबऱ्याचे लाडू यासारख्या पदार्थांचा समावेश असतो.
गोपीचंद पडळकर यांच्या ‘य़ा’ घोषणेमुळे महादेव जानकरांविषयीची जागी झाली आठवण
आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांसाठी पंचतारांकित संधी
समुद्राला कोळी बांधव नारळ अर्पण का करतात ? :
पावसाळ्यामुळे समुद्र खवळलेला असतो. समुद्राचा कोप होऊ नये व जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात यासाठी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात. तसेच समुद्राला आवाहन करून समुद्रात सोन्याचे आवरण असलेला नारळ अर्पण करतात. तसेच या दिवशी कोळी बांधव आपल्या नौका समुद्रात नेऊन मासेमारी करण्यासाठी जातात (On the day of Narli Pournima the fishermen take their boats out to sea for fishing).
चक्क हेअरबँडमध्ये लपवले साडे अकरा तोळ्यांचे सोने
Narali Purnima 2021: All hail Varuna Dev, the lord of oceans
नारळी पौर्णिमेपासून कोळी बांधव मच्छीमारीला सुरुवात करतात :
पावसाळा हा माश्यांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे या काळात कोळी बांधव मासेमारी करत नाही. श्रावणी पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ देऊन त्याची पूजा करून मगच मासेमारीला सुरुवात केली जाते. या दिवशी कोळी लोक होड्यांना रंगोरंगोटी करून सजवतात. तसेच भव्य मिरवणुका देखील या दिवशी काढल्या जातात.