टीम लय भारी
मुंबई: रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. तिथे काही भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना वाचवण्यासाठी विविध पातळीवर मदत पुरवली जात आहे. सध्या केंद्र सरकारतर्फे मिशन गंगा राबवण्यास सुरुवात झालीय. काही विद्यार्थ्यांना माघार आणण्यात यश आलंय. बरेच भारतीय विद्यार्थी या युद्धातून सुटून बाहेर आले आहे. मात्र अद्याप काहीजण अडकले आहेत. शरद पवार यांनीही मोदी सरकारला विनंती केली. यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी देखील ट्वीट करत केंद्र सरकारवर खोचक टीका केली.( BJP leader targets Pawar family)
टिका करत त्या म्हणाल्या, प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आपली पोरं वाचवा, असं ट्वीट त्यांनी केलं. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्या दोघांना चिमटा काढत रिट्विट केले आहे.
राज्याबाहेर काही घडले की या बापलेकीना कंठ फुटतो एरव्ही राज्यात सुमारे १०० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, राज्यात लूट सुरू आहे, महिला अत्याचार होतायत तेव्हा दोघे बहुधा एफएम वर गाणी ऐकत बसलेले असतात. pic.twitter.com/YJpACh5Md1
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 2, 2022
अतुल भातखळकर ट्वीट करत म्हणाले, “राज्याबाहेर काही घडले की या बापलेकीना कंठ फुटतो एरव्ही राज्यात सुमारे १०० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, राज्यात लूट सुरू आहे, महिला अत्याचार होतायत तेव्हा दोघे बहुधा एफएम वर गाणी ऐकत बसलेले असतात.”
हे सुद्धा वाचा
मलिकांच्या अटकेला मुस्लिम जातीचा उल्लेख देण्याचा प्रयत्न, दरेकरांचा गंभीर आरोप
राज्यातील विमानतळांच्या प्रश्नांवर संयुक्त बैठका लवकरच, ज्योतीरादित्य शिंदेचे आश्वासन
शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता
युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने जलद गतीने पावले टाकले पाहिजे”, असं शरद पवार यांनी ट्वीट करत केंद्र सरकारकडे विनंती केली आहे. हताशपणाचं गांभीर्य लक्षात घ्या – शरद पवारराष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना आवाहन केलं आहे. त्यावर शरद पवार यांना ट्वीट करत म्हटलंय की, “मी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विनंती करतो की, त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं. तसंच विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय यांची दुर्दशा आणि हताशपणाचं गांभीर्य लक्षात घ्या.” असं अवाहन त्यांनी ट्वीट केलं आहे.